पोस्ट्स

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

इमेज
अंबरनाथ: कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरू लागला आहे, त्यामुळे राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू केलेली रात्रीची संचारबंदी अंबरनाथमध्ये लागू करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.  अंबरनाथमध्ये आज २२ डिसेंबर २०२० पासून ५ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, या निर्णयामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद रहाणार असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले आहे.

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...

इमेज
करोडो रूपयांची उलाढाल होणार ठप्प... मुरबाड : दोनशे वर्षांची परंपरा आसलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठो म्हसा यांत्रा या वर्षी रद्द करण्यात आल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यातल्या रद्द झाल्याने करोडो रूपयांच्या उलाढालीचा ब्रेक लागणार आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी ही यात्रा ही यात्रा भरत असते. ही यात्रा सलग १५ दिवस सुरू रहाते असल्याने करोडो रूपयांची उलाढाल होत असते. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भोठ्या प्रमाणात व्यापारी या ठिकाणी येत असतात.  या यात्रेत हवेसे,नवशे गवसे यांच्या साठी पर्वणी असते. बैलगाडीच्या शैरती साठी लागणारे खिल्लारी बैल या यात्रेत खरेदी विक्री होत असल्याने बैल बाजारात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. ही यात्रा थंडीच्या महिन्यात सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात ब्लॅकेट व चादरींची  विक्री होत असते.  ही यात्रेत म्हसोबा देवाला केलेले नवस फेडण्यासाठी व नव्याने नवस करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात.  या ठिकाणी नवस फेडण्यासाठी म्हणजे गळ लावण्यासाठी भाविकांची गर्दी असते. गळ लावणे म्हणजे केलेला नवस...

TVs चांपियन बाईक स्पर्धेत जागृती पेणकर प्रथम

इमेज
सरळगाव : TVs  चांपियन स्पर्धेत कल्याण येथील जागृती पेणकर या युवतीने प्रथम क्रमांक पटकावल्याने तीचे सर्वच थरातून कौतूक होत आहे. ठाणे,पालघर जिल्हा वैश्य समाजाच्या कमीटीवर चिटणीस पदी कार्यरत असलेले किरण पेणकर यांची जागृती कन्या आहे.   वैश्य समाजात ठाणे, पालघर , रायगड,मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात  या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी जागृती ही एकमेव  स्पर्धक ठरली आहे.   या स्पर्धेसाठी भारतातून ३७ मुलीं स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या . त्यामधून १६ मुलींची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या १६ मुलींमध्ये खडतर अशा ४ फायनल घेण्यात आल्या. या चारी फायनल मध्ये जागृती हीने प्रथम, क्रमांक मिळवून आपला स्थान टिकवून ठेवले होते. अखेर १९ डीसेंबर २०२० रोजी झालेल्या चांपियन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उत्तम बाईक रायडर्स होण्याचा मान मिळवला.हा मान मिळवल्याने तिचे वैश्य समाजा बरोबरच महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.  Tvs कंपनीच्या वतीने २५ हजार रूपये रोख व TVs ची स्पोर्ट्स बाईक गाडीची चावी प्रधान केली.  "मला बाईक चालवण्याची लहानपणा पासून हाऊस  होती. ब...

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

इमेज
ठाणे: जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पुर्वतयारी करण्यात आली असुन यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहे.  तसेच पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.लस उपलब्धता झाल्यानंतर तातडीने मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  आयोजित कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, डॉ. विनायक जळगावकर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्र  असणार आहेत.  दर दिवशी १०० लस देणार आहेत. यानुसार एका दिवशी ८,५०० जणांना लस देण्यात येईल. यापद्धतीने नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. कोरोनाची लस येताच योग्य त्या तापमानात ठेवून ही लस लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. ग्रामीण भागातही या लसचं वितरण करण्यात येणार आहे. या लसची साठवणूक, त्याचे नियंत्रण व वितरणाच्या वेगवेग...

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

इमेज
मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस बोलत होते. काही निवडणुकांमध्ये इकडे तिकडे झाले म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत सोबत यावे (त्यांनी एकत्र निवडणूक लढवावी) ही तर आमची इच्छा आहे.ते सोबत आल्यामुळे त्यांना स्पेस उरणार नाही. एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही. या तिन्ही पक्षाने आपल्या संधी दिली आहे जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू. भाजपचे आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या ते उठवत राहतात. पण कुणीही जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात. या देशाचा वर्तमान आणि भविष्य हे...

पडघ्यात अवैध खैर साठ्यावर वनविभागाची धाड : सोलीव खैराची ५९ ओंडकी जप्त

इमेज
पडघा: भिंवडी तालुक्यातील पडघा वनपरीमंडळातील दुर्गम भागात असलेल्या एका गावात अवैधरीत्या दडवुन ठेवलेल्या खैर साठ्यावर वनविभागाने धाड टाकून सोलीव ५९ खैराची ओंडकी जप्त केल्याने खैर तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.  पडघा पाच्छापुर रस्त्यालगत असलेल्या राहुर - सावरोली गावादरम्यान एका शेतात मोठ्या प्रमाणात खैराची ओंडकी दडवून ठेवल्याची खबर वनविभागाला मिळताच पडघा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वनपाल डी. बी माळी, ए. एस. काटेस्कर, वनरक्षक बी. एन. आंबुलगेकर, एस. एन. चिपळूणकर, एस. शेलार, प्रमोद सुतार, विष्णु अस्वले, अजय राठोड, संदीप पाटील, शरद माढा, वनमजूर भगवान सवर, कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे चालक विकास उमतोल या वनविभागाच्या पथकाने या ठिकाणी सोमवारी धाड टाकून सोलीव खैराची २.५० लाख रुपयांची ५९ ओंडकी जप्त करून ताब्यात घेतली आहेत.

भिवंडीतील खासगी कर वसुलीचा ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

इमेज
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे.मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.यावेळी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील पालिका आयुक्तांकडे सादर केले. दरम्यान आंदोलनादरम्यान आपण पालिका आयुक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही.सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाही असे आश्वासन आम्हाला पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले असून जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर...